|| समर्थ वाणी ||
१३. मुळी उदक निवळ असते | नाना वल्ली मध्ये जाते |
मुळी उदक निवळ असते | नाना वल्ली मध्ये जाते |
संगदोषे तैसे होते | अंब्ल तिक्षण कडवट || १७/७/१||
पाणी मुळात स्वच्छ असते. अनेक प्रकारच्या वेलीमध्ये ते शिरते. आणि त्याच्या संगतीचा दोष लागून ते आंबट, तिखट किंवा कडू बनते. संगतीचा परिणाम असा आहे. मुळात आत्मा हा शुद्ध असतो पण त्याला देहाची साथ असते की त्याचे शुद्धपण लोपते आणि त्यांच्यात विकार उत्पन्न मार्ग. माणसामध्ये अंतरी आसक्ती ही सर्व विकारांची आई आहे. त्यामुळे याच जर मारले तर सर्व पिल्ले आपोआप मरून जातात असे समर्थांचे म्हणणे आहे पण उत्तम संगत सांगणे आहे. ज्याच्या संगतीत अंतरंग पालते अशा माणसांची नेहमी संगत धरावी.
या सृष्टीतील विवेकी लोकांची संगत प्रत्येकाने धरावी असा समर्थांचा आग्रह आहे. परंतु सत्संगाचा लाभ घेणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट असली तरी ती टिकणे फार मोठी गोष्ट आहे. कारण सामान्य माणसाला विषयोपभोगात अधिक रस असतो. देहाचे चोचले पुरविण्याकडे त्याचा अधिक कल असतो. या विकारांचा संगम देखील. दु:संग हा भक्तीमार्गातला मोठा अडसर आहे. नारद भक्तीसूत्रातील ४३ व्या सूत्रात 'दुसंग सर्वथा त्याज्य:' हे सांगून सत्संगाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. दु:संगाने काय घडते कारण भागवतात कपिल यांच्या संवादात पहा देवाहुस पहा. कपिलमुनी म्हणतात, “दुष्ट संग सत्य, पावित्र्य, दया, मनशीलता, बुद्धि, लज्जा, श्री, कीर्ती, क्षमा, मन:शांती, इंद्रिये वारणे आणि ऐश्वर्य इतर सर्व गुणांचा नाश होतो.” बुद्धीमंतानी दुष्टाच्या संगतीचा त्याग. आणि संत संगतीत राहण्याचा प्रयत्न. यत्नवादाची शिकवण व्यवहारे समर्थ प्रयत्नांची संगत ठेवण्याचे मार्गदर्शन करतात.....क्रमाश:
|| जय जय रघुवीर समर्थ ||
No comments:
Post a Comment