Friday, January 8, 2016

४. वाणीचे माधुर्य

                                                                         || श्रीराम ||

|| समर्थ वाणी ||

४. वाणीचे माधुर्य


      समर्थांनी मानवाला प्राप्त झालेल्या वाणीच्या सामर्थ्याबद्दल अनेक ठिकाणी वर्णन केलेले. शारदामातेचे स्तवन करताना समर्थांनी म्हंटले आहे,
जे उठती शब्दांकुर | वाडे वैखरी अपार | जे शब्दाचे अभ्यंतर | उकलून दावी || दा.द१.सं.३||
     शारदामातेचे हे सामर्थ्य समर्थांना ज्ञात आहे. शारदामातेच्या कृपे मूळ प्राप्त वाणीचे सामर्थ्य ओळखूनच समर्थांनी शारदामातेचे स्तवन केले आहे. वैखारी शब्दाद्वारे ही शक्ती व्यक्त होत असते. शारदामातेच्या कृपेचे मूळ शब्द हे सामर्थ्य माणसाला प्राप्त आहे, हे सर्व कर्तुत्व समूहच आहे, समर्थ म्हणतात.
                  ती वाचा अंतरी आले | ते वैखरिया प्रकट केले |
                  म्हणोनि कर्तुत्व जितुके जाले | ते शारदागुणे ||द.१/३/१४||
आपण मांडलेल्या ग्रंथाच्या प्राचार्यासाठी उत्तम शब्द सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून समर्थांनी आशीर्वाद मागून नमूद केले आहे. समर्थांनी ग्रंथरूपाने आपल्याला अमुल्य मिळवून दिले आहे त्याचे श्रेय ते स्वत: घेतात, तर हे सर्व बुद्धिचे, शब्दाचे सामर्थ्य, ईश्वरकृपेने प्राप्त विशाल समूह हे ग्रंथ कर्तुत्व आपल्या हातून घडत आहे हा कृतज्ञतेचा यामागे आहे.  
      शारदेचे हे महत्त्व तसेच शब्दाचे सामर्थ्य लक्षात ठेवा मनुष्य प्राण्याने त्याचा उपयोग करून पाहिजे. आपली वाणी जर गोड असेल तर मनुष्य जगमित्र होतो. आपल्या बोलण्यातून आपण अनेक मित्र जोडत असतो तसेच आपणही अनेक शत्रू निर्माण करत असतो. जगमित्र व्हंगे तर समर्थ म्हणतात
                   जग जगमित्र | जीवेपासी आहे सूत्र || दा.द.१९.सं.२.ओ.१९||
आपले बोलणे नम्रतेचे, आपल्या बोलण्याने इतरांची प्रसन्नता ठेवावीत, कोणाला दुखवू नये, आपल्या मृदू आणि लाघवी बोलण्याने आपण अनेकांनी मने स्वतःहून.....क्रमशः    




जय जय रघुवीर समर्थ 

No comments:

Post a Comment