Tuesday, January 29, 2013

नमस्कार   :)

           
       या संकेतस्थळावर समर्थ रामदासस्वामी लिखित श्रीमद दासबोध या ग्रंथामधील निवडक ओव्या घेऊन

त्यावरील चिंतन असे लिखाण करण्याचा मानस आहे. समर्थ रामदासस्वामी आणि त्याचे विचार आपल्याला

सतत मार्गदर्शक ठरतात. परंतु अध्यात्मिक ग्रंथ वा त्यातील विचार याबद्दल पाहण्याचा दृष्टीकोण काहीसा

संकुचित असल्यामुळे या ग्रंथाकडे , विचाराकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु जेव्हा यातील विचारांचे वाचन करून

चितन मनन घडते तेव्हा ते विचार कृतीत उतरवणे किती गरजेचे आहे हे वाचकांच्या लक्षात येते.
       
        आजच्या सामाजिक परिस्थितीबद्दल वेगळे लिहिण्याची गरज नाही . परंतु खूप कामात व्यस्त असणारे

आपण इतरांना काय स्वत:ला देखील वेळ देऊ शकत नाही. घरात , घराबाहेर,  ऑफीसमध्ये कुठेच आपल्याला

स्वस्थता लाभत नाही. भरपूर पैसा, गाडी, बंगला, सर्व सुखसोयी असताना देखील मनाला शांतता वा समाधान

लाभत नाही.  अशा या मनाच्या अवस्थेमध्ये श्रीमद दासबोधासारखे ग्रंथ मनाला निश्चित दिशा देण्याचे काम

करतात. मनावर संयम मिळविण्यासाठी कशाप्रकारचा विचार, वर्तन अपेक्षित आहे याविषयी हे ग्रंथ

निश्चितच मार्गदर्शक ठरतात.

          अशा या दासबोधाचे स्वरूप काय ? दासबोध ग्रंथ मला नेमके काय देऊन जातो याचा आढावा घेणारा

लेख प्रथम लिहून या संकेतस्थळाला आपण प्रारंभ करणार आहोत. त्या नंतर दासबोधातील निवडक

ओव्याच्या आधारे दासबोध समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .

           याशिवाय समर्थ रामदासस्वामी यांचे चरित्र, वाड्मय आणि इतर विषया वरील लेख तसेच भीमरूपी स्तोत्रावरील चिंतन वाचण्यासाठी समर्थ वाणी याठिकाणी भेट द्यावी धन्यवाद
                                                         
                                                         जय जय रघुवीर समर्थ 

No comments:

Post a Comment